बंद

    इतिहास

    परभणी जिल्हा न्यायालयाची स्थापना १९५१ साली निजाम राजवटीत झाली. जुन्या न्यायालयाच्या इमारतीला दारूल-इन्साफ असे नाव देण्यात आले. पहिले विद्यमान जिल्हा न्यायाधीश श्री. ताराचंद गुप्ता. जिल्हा न्यायालयाच्या नवीन न्यायालयाच्या इमारतीची स्थापना सन 1994 मध्ये करण्यात आली आणि मुंबई उच्च न्यायालयाचे माननीय न्यायमूर्ती, न्यायमूर्ती एम.बी.शाह यांच्या हस्ते दिनांक 24 ऑगस्ट, 1996 रोजी उद्घाटन करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी हे शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. शहर आणि रेल्वे स्टेशन आणि सेंट्रल बस स्टँडच्या अगदी जवळ आहे. जिल्हा न्यायालय, परभणी हे जिल्हाधिकारी, तहसील आणि महानगरपालिका कार्यालयाच्या लगत आहे. न्यायीक जिल्हा हिंगोली वेगळ न झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालय, परभणी मार्फतच महसुली जिल्हा हिंगोली चे ही कामकाज चालविल्या जाते परभणी जिल्ह्यांतर्गत परभणी, गंगाखेड, सोनपेठ, पाथरी, मानवत, पालम, सेलू, जिंतूर, आणि पूर्णा तालुके येतात आणि या सर्व तालुक्यांना न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत- शिवाय हिंगोली जिल्ह्याच्या अखत्यारीत येणारे तालुके हिंगोली, कळमनुरी, सेनगाव, बसमत आणि औंढा नागनाथ या ठिकाणीही न्यायालयांची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एकूण (14) तालुके समाविष्ट आहेत.